कुणाला वाटले तर वाटू द्या
आमचे नेहमीच वाकडय़ात आहे
पण बारा कोटीच्या मराठीची
मतदार संख्या शेकडय़ात आहे
शेकडय़ांनी निवडलेला
कोटीवरती लादला जातो
घाणेरडे राजकारण करून
डाव बरोबर साधला जातो
प्रक्रिया सुधारली पाहीजे
निवडणूकीनंतरच बोलले जाते!
अध्यक्षपद पटकावले की,
तोंड बरोबर खोलले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment