आजची वात्रटिका
--------------------
सामाजिक अनास्था
गणवेशापासून भोजनापर्यंत,
सगळे काही फुकट आहे.
तरी सरकारी शाळांची वाट ,
दिवसेंदिवस बिकट आहे.
फुकटच्यापेक्षा विकतच्याचा,
जनमानसावर प्रभाव आहे.
सरकारी शाळांची बदनामी,
म्हणे गुणवत्तेचा अभाव आहे.
बदनामीच्या डावपेचांना,
पूरक असे धोरण आहे!
सामाजिक अनास्थेमुळे,
सरकारी शाळांचे मरण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9336
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 जुलै 2026













