Sunday, January 29, 2012

प्रश्नचिन्ह

सर्वात आधी,सर्वात प्रथम
वाट्टेल ते बकू लागतात.
उतावळ्या पत्रकारीतेमुळे
बातम्यांचे ’टाईम्स’चुकू लागतात.

अंदाज आणि बातमी
हे दोन्हीही खूप भिन्न आहे !
तिला बातमी कसे म्हणावे ?
जिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...