Sunday, January 29, 2012

प्रश्नचिन्ह

सर्वात आधी,सर्वात प्रथम
वाट्टेल ते बकू लागतात.
उतावळ्या पत्रकारीतेमुळे
बातम्यांचे ’टाईम्स’चुकू लागतात.

अंदाज आणि बातमी
हे दोन्हीही खूप भिन्न आहे !
तिला बातमी कसे म्हणावे ?
जिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका30एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -328 वा

दैनिक वात्रटिका 30एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -328 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1RZ3Wi_-gdATkx2y6KC_v...