Wednesday, January 18, 2012

मुद्द्यावरून गुद्द्याकडॆ

काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.

मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...