Wednesday, January 18, 2012

मुद्द्यावरून गुद्द्याकडॆ

काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.

मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...