Monday, June 29, 2009

अरे चोरांनो.......



अरे चोरांनो.......

चोरली कुणाची कविता तर
निदान चोरी खपली पाहिजे.
कविता चोरावी अशी की,
ती आपल्याला झेपली पाहिजे.

चोरी ती चोरीच
कधी ना कधी फुटली जाते.
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट
वाचकांनाही पटली जाते.

इतर चोर्‍यांप्रमाणेच
कवितेचीही चोरी पचत नाही !
कारण काळीज हालल्याशिवाय
कविता कधी सुचत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


2 comments:

Lokesh Patade said...

वा खुप छान
चोरी तर चोरीच असते मग ती कशीही केली असो. आज काल दोन बोटांनीही चोरी होऊ शकते हे मान्य करायला काहीच हरकत नाही. प्रश्न राईट क्लिकचा नाही किंवा कॉपी पेस्टचा नाही प्रश्न कवीच्या भावनेचा आहे.

Unknown said...

it' reality sir

mast ahet sarvach

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...