Wednesday, August 15, 2012

दुर्दैव-विलास


ऐन रंगात आलेला डाव
अचानक खल्लास झाला.
महाराष्ट्राच्या दृष्टीने
हा दुर्दैवाचा विलास झाला.

राजकारण्यांना सांगून गेले
तुम्हीही चेहरा हसरा ठेवू शकता.
सरपंचांना आत्मविश्वास दिला
तुम्हीही मुख्यमंत्री होऊ शकता.


सुन्न झाली दिल्ली,
सुन्न झाली गल्ली
सुन्न बाभळगाव आहे!
अजातशत्रू राजकारण्याचे
विलासराव हे नाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...