Sunday, August 26, 2012

नैसर्गिक न्याय


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
मराठी साहित्यिकांची हद्द झाली
विश्व साहित्य संमेलनाची टूर
बरे झाले रद्द झाली.

चिमूटभर लोकांसाठी संमेलन,
इथे काही रसिकांची उणीव नाही!
ते कसले साहित्यिक?
ज्यांना दुष्काळाची जाणीव नाही!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...