Wednesday, December 26, 2012

ग्रामपंचायतींचा ताबा

ही अमक्याच्या ताब्यात असते,
ती तमक्याच्या ताब्यात असते.
नको त्याची मालकी
नको त्याच्या सुभ्यात असते.

पाठीवर विजयाचा गुलाल,
कपाळी कुणाचा तरी टिळा असतो !
स्वातंत्र्यापेक्षा गुलामीचाच
ग्राम पंचायतींना लळा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...