Thursday, July 8, 2010

राजकीय वारी

राजकीय पालखी सोहळा
अगदी गल्लोगल्लीत असतो.
कुणाचा विठोबा मुंबईत,
कुणाचा विठोबा दिल्ली असतो.

नेतु नामाचा गजर होऊन
कुठे झेंडे फडकविल्या जातात.
निष्ठेच्या पताका तर
शहरोशहरी अडकविल्या जातात.

कधी दिल्लीत,कधी मुंबईत
वारीवर वारी असते !
विठोबा कोणताही असो
त्याला भक्ती प्यारी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मत वाया जात नाही...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- मत वाया जात नाही... प्रत्येकाने ज्याला कुणाला मत दिले, तो प्रत्येकजणच निवडून येत नाही. तरीही याची ...