Thursday, July 8, 2010

राजकीय वारी

राजकीय पालखी सोहळा
अगदी गल्लोगल्लीत असतो.
कुणाचा विठोबा मुंबईत,
कुणाचा विठोबा दिल्ली असतो.

नेतु नामाचा गजर होऊन
कुठे झेंडे फडकविल्या जातात.
निष्ठेच्या पताका तर
शहरोशहरी अडकविल्या जातात.

कधी दिल्लीत,कधी मुंबईत
वारीवर वारी असते !
विठोबा कोणताही असो
त्याला भक्ती प्यारी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...