जे घरी बसत नव्हते
त्यांना घरी बसावे लागले.
ग्रामपंचायत सदस्यांना
नियमाचे फटके सोसावे लागले.
कळत असूनही वळत नाही
ही सामाजिक उणीव आहे!
ग्रा.पं. सदस्यत्व रद्द होणे
ही जबाबदारीची जाणीव आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment