Friday, November 20, 2009

२६/११ ते २०/११

***** आजची वात्रटिका *****
**********************

२६/११ ते २०/११

कुणाचाही कुणावर असो
शेवटी हल्ला हा हल्ला असतो.
आपण गप्प बसलो की,
भ्याडांचा असा पल्ला असतो.

हेही खरे की,
करावे तसे भरावे लागते.
दु:ख याचे की,पत्रकारालाच
हल्ल्याचे समर्थन करावे लागते.

विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...