आजकाल कुणाच्याही भावना
जास्तच कोमल होऊ लागल्या.
किरकोळ कारणांवरूनही
भावना दुखावल्या जाऊ लागल्या.
जाती-धर्माच्या नावावर तर
लोक ठार वेडे होतात !
सामाजिक भावनांबाबत मात्र
लोक पार रेडे होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment