Wednesday, June 1, 2011

नामांतर ते नामविस्तार

पुरूषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व
अगदी गृहीत धरलेले असते.
लग्नानंतर स्त्रियांचे नामांतर
अगदी पक्के ठरलेले असते.

दोन-दोन आडनावे लावण्याचा
स्वाभिमानी स्त्रियांना मोह असतो !
राजकारणाप्रमाणे संसारातही
नामांतराच्या प्रसंगाला
नामविस्ताराचा शह असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...