Wednesday, June 1, 2011

नामांतर ते नामविस्तार

पुरूषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व
अगदी गृहीत धरलेले असते.
लग्नानंतर स्त्रियांचे नामांतर
अगदी पक्के ठरलेले असते.

दोन-दोन आडनावे लावण्याचा
स्वाभिमानी स्त्रियांना मोह असतो !
राजकारणाप्रमाणे संसारातही
नामांतराच्या प्रसंगाला
नामविस्ताराचा शह असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...