Monday, April 30, 2012

शेवटची सोय


अमुक खाल्ले, तमुक खाल्ले
अशा गोष्टी बोलल्या जातात.
मात्र खाणारांकडून सर्वात जास्त
जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात.

जणू मृत्यूनंतरची व्यवस्था
जिवंतपणीच लावली जाते!
फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे
शेवटची सोय करून ठेवली जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...