Monday, April 30, 2012

शेवटची सोय


अमुक खाल्ले, तमुक खाल्ले
अशा गोष्टी बोलल्या जातात.
मात्र खाणारांकडून सर्वात जास्त
जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात.

जणू मृत्यूनंतरची व्यवस्था
जिवंतपणीच लावली जाते!
फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे
शेवटची सोय करून ठेवली जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...