Saturday, April 28, 2012

पुरस्कारांची हौस



भारतरत्न पुरस्कार मिळालेलेही
गल्लीरत्नाला नाही म्हणत नाहीत.
देणारे देतात, घेणारे घेतात,
कुणालाच कुणी काही म्हणत नाहीत

एकदा भारतरत्न मिळाले की,
बाकी पुरस्कारांची गरजच काय आहे?
खर्‍या गरजवंतावरती
हा सरळ सरळ अन्याय आहे!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...