Wednesday, April 11, 2012

टंचाई आणि दुष्काळ


तगमग असह्य होऊन
त्याचा श्वास दाटायचा.
ती ज्याला टंचाई म्हणायची
त्याला तो दुष्काळ वाटायचा.

टंचाई आणि दुष्काळातले
अंतरच न कळणारे असते!
दिसतानाही दुष्काळ नाकारणे
दुष्काळापेक्षाही छळणारे असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...