Tuesday, May 19, 2009

पराभवाचे अपचन

पराभवाचे अपचन


जसा राजकारणाचा कडू घोट
सहज रिचवता आला पाहिजे
तसा राजकीय पराभवही
सहज पचवता आला पाहिजे.


कार्यकर्त्यांच्याही पचनी
पराभव पडायला पाहिजे !
ज्यांना हे जमत नाहीत्यांनी,
राजकारण सोडायला पाहिजे!!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...