Friday, October 22, 2010

नरबळींचा संदेश

आम्ही मेलो ते मेलो,
उरलेल्यांना तरी वाचवू शकता.
पुरोगामित्त्वाचा संदेश
तुम्ही घरोघरी पोचवू शकता.

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा
जर प्रत्यक्षात आला असता.
कदाचित आम्हां दुर्दैवी जीवांना
त्याचा नक्की फायदा झाला असता.

सांगणारा मूर्ख आहे,
कायदा धर्माच्या आड येतो आहे !
तुमचा बळी गेल्यावर समजेल
तो धर्माच्या नावाने भाड खातो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...