प्रशासनापेक्षा शासनाचाच
गाजावाजा जास्त झाला.
आदर्शाचा पहिला बळी म्हणून
अशोकपर्वाचा अस्त झाला.
अशोकपर्वाचा अस्त होताच,
बाकीचेही बुजले आहेत !
हे विसरूण चालणार नाही,
सोसायटीला ३१ मजले आहेत !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment