बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.
उरलेल्या ठिकाणी
लेकी-सुना बसवल्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना
पद्धतशीर प्रसवल्या जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment