Friday, November 19, 2010

लोकशाहीच्या वल्गना

बाप केंद्रात,मुलगा राज्यात,
जिल्हा परिषदेत नातू असतो.
कुणी म्हणायला गेले तर
जनकल्याण हाच हेतू असतो.

उरलेल्या ठिकाणी
लेकी-सुना बसवल्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना
पद्धतशीर प्रसवल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...