Friday, November 12, 2010

वेडी आशा

कितीही काढायचे म्हटले तरी
आमच्या मनातून जात नाही.
दिल्लीने दाखवून दिले
महाराष्ट्रात स्वच्छ ’हात’नाही.

’गर्जा महाराष्ट्र माझा’म्हणण्याची
काही सोय उरली  नाही !
बरबटलेल्या राजकारणातही
आम्ही हिंमत हारली नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...