Saturday, November 20, 2010

खातेवाटप

हे नको;ते हवे,
प्रत्येक मंत्री कुंथत असतो.
मालदार खात्यामध्येच
सर्वांचा जीव गुंतत असतो.

शेवटी मिळेल ती जबाबदारी
पार तर पाडली जाते !
खाते भाकड असले तरी
त्यातून मलई काढली जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...