Tuesday, February 1, 2011

राजकीय भेसळ

तत्त्व,धोरण आणि निष्ठांची
सगळी मिसळामिसळ आहे.
आघाड्या आणि युत्या म्हणजे
राजकीय भेसळ आहे.

एकमेकांची अशुद्धता
आजकाल कुणाला जाचत नाही !
भेसळ अपरिहार्य झाल्याने
राजकीय शुद्धता पचत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...