Saturday, April 23, 2011

चिरंजीव भव !

एक बाबा गेला की,
दुसरा बाबा उगवला जातो.
अशा भोंदूंकडूनच
भोळा भक्त नागवला जातो.

सारे भोंदूपणापुढे झुकलेले
सत्यापुढे कुणीही शरण नाही!
भक्तांच्या भोळेपणाला
कधीसुद्धा मरण नाही !!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...