Sunday, May 15, 2011

’घर-घर’ की कहानी

पैसा झाला मोठा,
माणूस खोटा होतो आहे.
’हम दो हमारे दो’ मुळे
सांस्कृतिक तोटा होतो आहे.

ज्याची त्याची गरज
पैशावरती भागली आहे.
घर नावाच्या संस्कृतीला
घर-घर लागली आहे.

प्रायव्हसी जपतानाच
कौटुंबिक जाणीव ठेवावी लागेल !
नसता घरा-घरावरती
’रेस्ट हाऊस’ची पाटी लावावी लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...