Wednesday, May 25, 2011

बळीचे बकरे

सगळेच पर्याय संपले की,
स्वार्थी पर्याय सूचला जातो.
नेत्यांची किंमत वाढते
कार्यकर्ता मात्र खचला जातो.

नको तो विचार,नको तो मार्ग,
कार्यकर्त्यांच्या गळी असतो !
नेत्यांच्या पुनर्वसनात
कार्यकर्त्यांचा बळी असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...