Wednesday, May 25, 2011

बळीचे बकरे

सगळेच पर्याय संपले की,
स्वार्थी पर्याय सूचला जातो.
नेत्यांची किंमत वाढते
कार्यकर्ता मात्र खचला जातो.

नको तो विचार,नको तो मार्ग,
कार्यकर्त्यांच्या गळी असतो !
नेत्यांच्या पुनर्वसनात
कार्यकर्त्यांचा बळी असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...