सगळेच पर्याय संपले की,
स्वार्थी पर्याय सूचला जातो.
नेत्यांची किंमत वाढते
कार्यकर्ता मात्र खचला जातो.
नको तो विचार,नको तो मार्ग,
कार्यकर्त्यांच्या गळी असतो !
नेत्यांच्या पुनर्वसनात
कार्यकर्त्यांचा बळी असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment