कधी यांचा,कधी त्यांचा
मुद्दा पळवला जातो.
मुद्दा डोईजड झाला की,
गुद्दय़ाने मुद्दा वळवला जातो.
मुद्दय़ांपेक्षा गुद्दय़ांचेच
राजकारण प्रचलित होत आहे!
मुद्दे आणि गुद्दे बघून
जनता विचलित होत आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment