Sunday, July 3, 2011

अनुभवाचे बोल

दाबलेला विद्रोही आवाज
कसाबसा उसळला गेला.
नामदेवाचा संयम
अखेर ढासळला गेला.

आपला जो ’गोलपीठा’झाला,
तो रामदासाचा होवू नये.
उष्टावळ न देणारांनी
भरल्या ताटाचे आवतन देऊ नये.

फक्त कवितेपूरते ठीक होते,
या सत्तेत जीव रमत नाही !
अनुभव हाच खरा गुरू
यात कुणाचेच दुमत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...