Sunday, July 3, 2011

अनुभवाचे बोल

दाबलेला विद्रोही आवाज
कसाबसा उसळला गेला.
नामदेवाचा संयम
अखेर ढासळला गेला.

आपला जो ’गोलपीठा’झाला,
तो रामदासाचा होवू नये.
उष्टावळ न देणारांनी
भरल्या ताटाचे आवतन देऊ नये.

फक्त कवितेपूरते ठीक होते,
या सत्तेत जीव रमत नाही !
अनुभव हाच खरा गुरू
यात कुणाचेच दुमत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...