Sunday, July 3, 2011

अनुभवाचे बोल

दाबलेला विद्रोही आवाज
कसाबसा उसळला गेला.
नामदेवाचा संयम
अखेर ढासळला गेला.

आपला जो ’गोलपीठा’झाला,
तो रामदासाचा होवू नये.
उष्टावळ न देणारांनी
भरल्या ताटाचे आवतन देऊ नये.

फक्त कवितेपूरते ठीक होते,
या सत्तेत जीव रमत नाही !
अनुभव हाच खरा गुरू
यात कुणाचेच दुमत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...