Wednesday, July 27, 2011

दुबार पेरणी

मातीमध्ये पुरूनसुद्धा
काही शिल्लक उरावे लागते.
आभाळमाया आटली की,
पुन्हा एकदा पेरावे लागते.

कधी अस्मानाची,
कधी सुलतानाची करणी असते.
कधी वांझोटय़ा बियाणांमुळे
दुबाराची पेरणी असते.

दुबार काय, तिबार पेरा
दुर्दैवाचा फास सुटला पाहिजे!
पिकाच्या दाण्यादाण्यातून
आता सुरुंग फुटला पाहिजे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...