Friday, July 29, 2011

लोकश्रद्धेचा बळी

निवडणूक जिंकता आली की,
त्याचा लोकप्रतिनिधी होतो.
जरी लोकशाही मार्गाचा
निवडणुकीत अंत्यविधी होतो.

मग लोकशाहीचे दिवसच काय?
चक्क पाच वर्ष घातले जातात!
लोकश्रद्धेचा बळी घेऊन
लोकांनाच ऊतले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...