Friday, July 29, 2011

लोकश्रद्धेचा बळी

निवडणूक जिंकता आली की,
त्याचा लोकप्रतिनिधी होतो.
जरी लोकशाही मार्गाचा
निवडणुकीत अंत्यविधी होतो.

मग लोकशाहीचे दिवसच काय?
चक्क पाच वर्ष घातले जातात!
लोकश्रद्धेचा बळी घेऊन
लोकांनाच ऊतले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...