निवडणूक जिंकता आली की,
त्याचा लोकप्रतिनिधी होतो.
जरी लोकशाही मार्गाचा
निवडणुकीत अंत्यविधी होतो.
मग लोकशाहीचे दिवसच काय?
चक्क पाच वर्ष घातले जातात!
लोकश्रद्धेचा बळी घेऊन
लोकांनाच ऊतले जातात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment