जातिनिहाय जनगणना
जी पाळली जात होती
ती आता मोजली जाईल.
निश्चित अशा आकडेवारीने
जत नव्याने सजली जाईल.
जातिनिहाय जनगणनेमुळे
पश्चातापाची पाळी येऊ नये !
आकड्यांचे विकासकारण व्हावे
फक्त राजकारण होऊ नये !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment