Thursday, August 12, 2010

जातिनिहाय जनगणना

जातिनिहाय जनगणना

जी पाळली जात होती
ती आता मोजली जाईल.
निश्चित अशा आकडेवारीने
जत नव्याने सजली जाईल.

जातिनिहाय जनगणनेमुळे
पश्चातापाची पाळी येऊ नये !
आकड्यांचे विकासकारण व्हावे
फक्त राजकारण होऊ नये !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...