Sunday, October 21, 2012

खरे विजेते

जसा भ्रष्टा्चार केला जातो,
तसा तो करविला जातो.
व्यवस्थेच्या चक्रव्यूहात
प्रामाणिकपणा हरविला जातो.

काहीजण इच्छा नसताना खातात,
काहीजण मुळीच खात नाहीत !
ज्यांचा प्रामाणिकपणा हरत नाही,
ते व्यवस्थेला शरण जात नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...