Saturday, December 11, 2010

विटाळ

देशाचे विचारचक्रच
घोटाळ्यांभोवती घोटाळू लागले.
पावित्र्याचा आव ज्यांचा
असे सारेच विटाळू लागले.

कोणी म्हणतो,राजकीय सुपारी;
कोणी म्हणतो,हे किटाळ आहे !
पण देशात सर्वत्र
घोटाळ्यांचा विटाळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...