Sunday, December 12, 2010

भोंदू रे भोंदू

भोंदूना भोंदू म्हटले तर
भोंदूना राग येऊ लागले.
दोन तोंडांची गांडूळं
जहरी नाग होवू लागले.

आंधळ्या भक्तीचे जहर
लोकांना चढवित आहेत.
अधर्म..अधर्म..म्हणीत
भामटे ऊर बडवित आहेत.

ज्याचे त्यालाच कळेना
बोलून उपयोग काय आहे ?
कसायांचा दोष नाही,
त्यांनाच धार्जिन गाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...