Sunday, December 12, 2010

भोंदू रे भोंदू

भोंदूना भोंदू म्हटले तर
भोंदूना राग येऊ लागले.
दोन तोंडांची गांडूळं
जहरी नाग होवू लागले.

आंधळ्या भक्तीचे जहर
लोकांना चढवित आहेत.
अधर्म..अधर्म..म्हणीत
भामटे ऊर बडवित आहेत.

ज्याचे त्यालाच कळेना
बोलून उपयोग काय आहे ?
कसायांचा दोष नाही,
त्यांनाच धार्जिन गाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...