Sunday, December 12, 2010

भोंदू रे भोंदू

भोंदूना भोंदू म्हटले तर
भोंदूना राग येऊ लागले.
दोन तोंडांची गांडूळं
जहरी नाग होवू लागले.

आंधळ्या भक्तीचे जहर
लोकांना चढवित आहेत.
अधर्म..अधर्म..म्हणीत
भामटे ऊर बडवित आहेत.

ज्याचे त्यालाच कळेना
बोलून उपयोग काय आहे ?
कसायांचा दोष नाही,
त्यांनाच धार्जिन गाय आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...