Thursday, February 16, 2012

द्या टाळी !


प्रचाराचे मुद्दे सोडून
उखाळय़ा-पाखाळय़ा काढल्या जातात.
राजकीय कलगीतुरा रंगताच
हशा आणि टाळय़ा पडल्या जातात.

ते तर भुलवायलाच येतात
आपण सावध असावे लागते!
आपण दात काढीत राहिलो की,
टाळय़ा वाजवीत बसावे लागते!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...