Thursday, May 3, 2012

दुष्काळाचे मोजमाप

टंचाई आणि दुष्काळात
सरकारी अंतर असते.
दुष्काळ ठरविणारे
आणेवारीचे तंतर असते.

आणेवारीच्या मापाने
दुष्काळ मोजला जातो !
अस्मानी आणि सुल्तानी दुष्काळ
पाचवीलाच पूजला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...