****** आजची वात्रटिका *****
************************
प्रश्नांकीत राजकारण
नवे प्रश्न बाजूला ठेवुन
जुनेच प्रश्न उगळीत असतात.
पाहिजे तेंव्हा,पाहिजे ते
प्रश्न नव्याने चिघळीत असतात.
एकदा प्रश्न चिघळला की,
लोकनायक ठरणे सोपे जाते !
लोक अस्थिर असले की,
लोकांवर राज्य करणे सोपे जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment