Thursday, January 6, 2011

जाहिर कबुली

इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमाने
पत्रकारिता देखणी झाली.
गुळ्गुळीत कागदी स्पर्शाने
बुळबुळीत लेखणी झाली.

कुणाच्या देखणेपणाला
कमी लेखण्याचा हेतू नाही.
सत्ता-संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा
पत्रकरिता हा सेतू नाही.

धंदेवाईकपणा कबुल करा
सतीसावित्रीचा आव नको !
एकमेकांचे डोळे झाकून
आंधळ्या कोशिंबीरीचा डाव नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- विलीनीकरणाचा मुद्दा इकडूनही मुद्दा ताणला जातो, तिकडूनही मुद्दा ताणला जातो. विलीनीकरणाच्या कढीला, प...