Wednesday, January 12, 2011

तारूण्याची जबाबदारी

तरूण असून उपयोग नाही,
तारूण्य कळले पाहिजे.
तारूण्य साचलेले नको,
तारूण्य सळसळले पाहिजे.

नवी आव्हाने पेलताना
माय-मातीची लाज नको.
तारूण्याचा उत्साह असावा
तारूण्याचा माज नको.

तनात असले तरी
मनात तारूण्य पाहिजे !
वेधक असावे,भेदक असावे,
नजरेतही कारूण्य पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- विलीनीकरणाचा मुद्दा इकडूनही मुद्दा ताणला जातो, तिकडूनही मुद्दा ताणला जातो. विलीनीकरणाच्या कढीला, प...