Sunday, January 30, 2011

भेसळीचा कारभार

भेसळीची भीती कुणाला?
भेसळखोर बेदरकार आहे.
मुंबई असो वा दिल्ली
भेसळीचेच सरकार आहे.

जसे काय भेसळ म्हणजे
जीवनाचा अविभाज्य घटक आहे?
भेसळीच्या कारभाराची
लोकशाहीलाही चटक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...