Saturday, January 8, 2011

थंडीची लाट

कधी उष्णतेची,
कधी थंडीची लाट असते.
माणसाची निसर्गाशी
कायमचीच गाठ असते.

उष्णतेने पारा चढतो,
थंडीने पारा उतरत असतो.
निसर्ग माणसावर
सकारण बिथरत असतो.

लाट कोणतीही असो
माणसे त्यावर स्वार होतात !
आईसक्रिमच्या कपापेक्षा
बाटल्यांचेच खळखळाट फार होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- विलीनीकरणाचा मुद्दा इकडूनही मुद्दा ताणला जातो, तिकडूनही मुद्दा ताणला जातो. विलीनीकरणाच्या कढीला, प...