आजची वात्रटिका
--------------------
नैतिकतेच्या नावानं..
नैतिकतेच्या मुद्द्यावर,
सारेच मूक आणि स्तब्ध आहेत.
राजकारण आणि नैतिकता,
हे जणू विरुद्धार्थी शब्द आहेत.
इतिहासाचे दाखले द्यायचे,
ही गोष्ट ग्राह्य झाली आहे.
राजकारणातून नैतिकता,
केव्हाच कालबाह्य झाली आहे.
नैतिकता कालबाह्य झाली तरी,
तिला पुन्हा पुन्हा उजवले जाते !
नैतिकतेचा उदो उदो करीत,
अनैतिकतेला रुजवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8838
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23फेब्रुवारी2025
No comments:
Post a Comment