******* वात्रटिका********
*********************
राजकीय आगडोंब
राजकारणी देतात पेट्वून
मग गावं धगधगत राहतात
पेटलेल्या ज्वालांची मजा
मनसोक्तपणे बघत राहतात.
आपण पेटवले गेलोय
हे गावांनाही कळालेले असते !
तोपर्यंत गावांचे गावपण
मुळासकट जळालेले असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
No comments:
Post a Comment