******* वात्रटिका *******
*********************
चप्पल म्हणाली बुटाला
तुझा माझा जोडा
आता शोभुन दिसायला लागला
तुझ्याबरोबर माझाही प्रसाद
आता नेत्यांना बसायला लागला.
जनतेने ओळखले आहे,
पायाची वहाण पायीच बरी नाही !
मानसिक संतुलन ढासळल्याची
त्यांची दावेदारी काहीच खरी नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
1 comment:
मस्तच ............. सगळ्या वात्रटिका छान आहेत. :)
Post a Comment