Sunday, March 11, 2012

प्राथमिक जबाबदारी

आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्‍यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.

पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!




- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...