Sunday, March 11, 2012

प्राथमिक जबाबदारी

आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्‍यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.

पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!




- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निकालाची टक्केवारी आपल्या गुणवत्तेची परिमाणे, पारंपरिक आणि पक्के आहेत. निकाल विचारायला लावतो, कुणा...