Sunday, March 11, 2012

प्राथमिक जबाबदारी

आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्‍यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.

पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!




- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...