Monday, March 19, 2012

जल-स्वराज्य

गावच्या गावं तहानलेली
कुणी पोटभर पाणी प्याले नाही.
पाण्यासारखा पैसा गेला
पण 'जलस्वराज्य' आले नाही.

दीडशे वर्षानी स्वराज्य मिळाले
पण 'जलस्वराज्या'चा पत्ता नाही!
आता लढावे तरी कुणाविरुद्ध?
आता काही परक्यांची सत्ता नाही!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...