ते म्हणाले, हय़ांनी शब्द पाळला नाही.
हे म्हणाले, त्यांनी शब्द पाळला नाही.
त्यांचे माहिती नाही पण,
आम्हाला आघाडी धर्म कळला नाही.
शब्दाने शब्द वाढवून
वाद वाफसायचा असतो!
जणू आघाडी धर्म म्हणजे
पाठीत खंजीर खुपसायचा असतो!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment