Tuesday, March 27, 2012

अर्थाचा अनर्थ

महाराष्ट्राकडून महाराज्याकडे
हाच संकल्पाचा अर्थ आहे.
मंत्री आणि आमदारांना वाटतेय
हा संकल्पच व्यर्थ आहे.

एवढे मात्र कबूल की,
हा अर्थसंकल्प शिलकी आहे!
विरोधकांपेक्षा सहकार्‍यांचीच
प्रतिक्रिया कितीतरी बोलकी आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...