आजची वात्रटिका
-------------------------
सामाजिक अवस्था
कुणी मेले काय?कुणी जगले काय?
लोकांनाही कशाचे काही वाटत नाही.
कितीही टाहो ऐकले तरी,
कुणाला हुंदकाही सुद्धा फुटत नाही.
जणू काय आजकाल लोकांची,
सगळी संवेदनशीलता मेली आहे !
रोजचेच मढे त्याला कोण रडे,
यामुळेच ही अवस्था झाली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8377
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑक्टोबर2023
No comments:
Post a Comment