Sunday, July 5, 2009

दळभद्री विचार

***** आजची वात्रटिका *****
**********************

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर
दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.
रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र
नवाच प्रश्न पडू लागला.

नामकरणाच्या राजकारणाशिवाय
राजकारण्यांना जगता येणार नाही !
भिकार्‍यांचे दु:ख हे की,
त्या पुलाखाली बसून
भिक मागता येणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...