***** आजची वात्रटिका *****
**********************
दळभद्री विचार
मुंबईतला सागरी पूल तर
दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.
रस्त्यावरच्या भिकार्यांना मात्र
नवाच प्रश्न पडू लागला.
नामकरणाच्या राजकारणाशिवाय
राजकारण्यांना जगता येणार नाही !
भिकार्यांचे दु:ख हे की,
त्या पुलाखाली बसून
भिक मागता येणार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment